Ads

Monday, December 31, 2018

"आठवणील पठाणकोट एअर फोर्स स्टेशन"

 31 डिसेंबर 2015 त्यादिवशीही एकीकडे संपूर्ण देश नवीन इंग्रजी वर्षाच्या स्वागताच्या तयारीत होता, तर दुसरीकडे एक मोठे संकट नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी देशाच्या पदरात पडणार होते. परंतु याचा काहीच मागोवा कोणालाच नव्हता असेच म्हणावे लागेल.
 भारतामधील पंजाब राज्यातील जानियाल गावामध्ये चार आतंकवादी भारतीय सीमेमध्ये येतात ते देखील भारतीय सैन्यदलाच्या गणवेशामध्ये. पुढे त्यांना एक टॅक्सी मिळते व ते त्यात बसून पुढील कामासाठी निघतात. काही काळानंतर त्या आतंकवाद यामधील एक आतंकवादी त्यांचा पाकिस्तानामध्ये बसलेल्या मोरक्या फोन करून संपर्क साधतात. त्या गाडीचालकाला कदाचित त्या आतंकवाद्यांचे मनसुबे कळाले असावेत बहुदा, म्हणून त्याने जाणूनबुजून आपल्या गाडीचा अपघात केला. पण झालेल्या सर्व प्रकारात त्या गाडी चालकास (एकागर सिंग) आपल्या प्राणास मुकावे लागले.
 थोड्या कालावधीनंतर ते आतंकवादी एका स्थानिक पोलिस अधिक्षकास व दोन नागरीकांस बंधक बणवतात व पुढील वाटचाल सुरू करतात.
 थोड्या वेळानंतर ते त्या गाडीला सोडून एका नागरीकाचा गळा कापून व बाकीच्या दोघांना तसेच सोडून पठाणकोट कडे निघतात.सुदैवाने जखमी असलेल्या ईसमाचे प्राण वाचले जातात.
 1 जानेवारी 2016 सकाळी पाच वाजता सगळे आतंकवादी पठाणकोट एअरबेजमध्ये प्रवेश करतात. हा सगळा प्रकार होत असताना सुरक्षा व्यवस्थेला काहीतरी गडबड असल्याचे कळते,तर दुसरीकडे बंधक असलेल्या पोलिस कर्मचारी झालेल्या सर्व प्रकारा बद्दलची माहीती संबंधीताना देतो.
घडलेल्या सर्व प्रकाराबद्दल अजित देव म्हणतात की त्या वेळी फक्त 45मी.मध्ये एक योजना आखली गेली व अवघ्या 15मी.मध्ये ओजना कार्यंनवित झाली.

 त्याच वेळी प्रसंगावधान राखण्यासाठी संबंधीत अधिकाऱ्यांनी भारतीय वायू सेनेचे सर्वात महत्वाचा भाग असलेल्या "गरुड कमांडो फोर्स" ला व तसेच "वेस्टर्न एअर कमांडोस" आणि NSG ला operatation करण्याची परवानगी दिली.

१ जानेवारी २०१६ ला रात्री ९ वाजून ४५ मी. सर्व टीम ला झालेल्या सगळ्या प्रकाराबद्दल माहिती देण्यात आली व पशन चालू करण्याचे आदेश देण्यात आले .
रात्रीचा सहारा घेऊन आतंकवादी लपलेल्या डंप यार्ड मधून बाहेर आले पण,वायू सेनेच्या ड्रोन ने त्यांना पकडले व गरुड कमांडोची टीम तिथे लागलीच पोहचली.त्या ठिकाणी झालेल्या गोळीबारात भारतीय सेनेचे दोन जावान जखमी झाले व ते आतंकवादी तेथून पळ काढण्यात यशस्वी ठरले.

२ जानेवारी २०१६ सकाळी आतंकवादी वेगवेगळे होऊन अंदाधुंद गोळीबार करू लागले त्यामुळे अनेक जावान जखमी झाले तर काही मृत्युमुखी पडले.त्याचवेळी सुभेदार जगदीश चंद यांनी प्रसंगावधान राखून स्वतः नि:शस्त्र असताना एका आतंकवाद्याला पकडून ठार केले.झालेल्या सर्व प्रकारात त्यांना त्यांचा जीव गमवावा लागला.
त्या नांतर उरलेले आतंकवादी लगतच्या जंगलात लपण्यासाठी गेले खरे पण भारतीय सैनिकांनी त्यांना त्या जंगलात चारही बाजूने घेरून ठेवले.अशीच स्थिती सकाळी १० वाजे पर्यंत होती म्हणजे जवळ पास ४ तास सैनिक कुठलीही हालचाल न करता त्या ठिकाणी नजर ठेऊन  होते.
आणि शेवटी सकाळी चकमकीस सुरुवात झाली, त्या मध्ये आतंकवादी असौल्ट रायफल,हॅन्ड ग्रेनेड चा वापर करत होते.
थोड्या वेळा नंतर एअर मार्शल यांच्या लक्षात आले कि जंगलातील झाड झुडुपांमुळे त्यांना ठार करण्यात अपयश येत आहे म्हणून त्यांनी एक धाडसी निर्णय घेतला तो म्हणाजे "मी-३५" ची मदत घेण्याचा.मी-३५ च्या जोरदार हमल्यामुळे त्या आतंकवाद्यांना आपले ठिकाण अनावधानाने दाखवावे लागले .आणि त्या नंतर NGS च्या सर्व सेनिकांनी त्या आतंकवाद्यांनी ठार करणात यश मिळाले .ही चकमक सुमारे ४ वाजे पर्यंत चालू होती.

शेवटी ३ जानेवारी २०१६ ला ROV च्या मदतीने त्या आतंकवाद्यांच्या देहास बाहेर काढण्याचा निर्णय घेतला कारण त्यांनी आपल्या शरीरात बॉम्ब वगैरे लावला असल्याची शक्यता होती.परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे तो पर्याय चुकीचा ठरला ,आणि शेवटी भारतीय जवानांनी एक धाडसी निर्णय घेतला व ते स्वतः त्या ठिकाणी गेले.
त्या नंतर लेफ्ट.कर्नल.निरंजन व मेजर.त्यागी यांनी एक एक करून २ मृतदेह बाहेर काढले पण तिसऱ्या वेळेस त्या देहात असलेला हॅन्ड ग्रेनेड सक्रिय झाला व निरंजन यांना आपल्या प्राणास मुकावे लागले तर त्यागी यांना गंभीर इजा झाली.
त्या नंतर संपूर्ण २००० ऐकर्स. ची संपूर्ण तपासणी केली.त्याच दरम्यान आजून दोन आतंकवादी एका घरात सापडले व NSG  च्या सैनिकांनी त्यांना manatol cocktel टाकून संपूर्ण घराला आग लावून दिली व सकाळी पूर्ण घराची तपासनी करण्यात आली.

आणि अखेर  ६ जानेवारी २०१६ ला चक्क ६ दिवसा नंतर "पठाणकोट ऐरबसे" ला सुरक्षित घोषित करण्यात आले.

भारत माता की जय.
वंदे मातरम्.
(लेख आवडल्यास नक्की share करा,like करा,आणि आजून कोणत्या विषयावर माहिती हवी असल्यास नक्की कळवा.काही चुका असतील त्या देखील कळवायला विसरू नका,व लेख कसा आहे ते comment box मध्ये नक्की कळवा.)
पोस्टमधील माहिती  संदर्भ :- History TV18 .
Images संदर्भ:- www.google.com

Wednesday, July 18, 2018

राज-कारण मुक्या प्राण्यांचे...

राज-कारण मुक्या प्राण्यांचे...

आज एकद चर्चेत असलेला विषय निवडला आहे पण त्य आधी एक गोष्ट सांगू ईच्छीतो ते म्हणजे शिर्षकामधील मुके प्राणी म्हणजे फक्त आणि फक्त गाई,गुरे नव्हे तर तो शब्द केवळ काही समाजकंटकांनी भडकावू भाषणे केली की एखादा अणु विस्पोट व्हावा असे पेटून उठणाऱ्यांसाठी वापरला आहे.
सध्या महाराष्ट्र राज्याची स्थीती पाहता आज प्रत्येक राजकारण्यांना एकच प्रश्न मला विचारावसा वाटतो तो म्हणजे ,"आत्ता का?" म्हणजे अगदी ताजाच प्रश्न घेवू दुधाचा!दर वाठ जर आधीच केली असती किंवा त्या सगळ्या शेतकऱ्यांचे प्रश्न आधीच सोडवले असते तर आज ही वेळ आली असती का वो?हा विचार पेटुन उठणारा कार्यकर्ता कधीच करत नाही. कार्यकर्ता हा एक असा व्यक्ती असतो जो स्वत:च्या सख्या बापाच कमी पण त्या त्याच्या दिड दमडीच्या साहेबाच ऐकत असतो.असो तो आपला विषय नाही.
आज दोन दिवस झाले साधारणत: शेकडो लिटर दुध आज काही मुर्ख माणसांनी रस्त्यावर अक्षरश: फेकून दिले.अगदी दुरदर्शन वर बातमी पाहतानाही तुळतुळ वाटते.मुळात पाहायच झालंच तर वरी वापरलेला मुर्ख हा शब्द त्या दुध वाया घालणाऱ्या लोकांना वापरणे योग्य नाही होणार कारण हे सगळ कारस्थान हे त्यांच्या नेत्यांचेच आहे त्यामुळे त्या त्या नेत्यांनाच शिव्या द्याव्यात. दुसरा मुद्दा असा की प्रश्न हे चर्चेने सोडवता येतातच,बर ते ही नाही शक्य झाले तर सगळ्यांना घेवून जाब विचारू शकतो आपण,बरं ते ही नाही जमलचं तर तुम्ही दुध गरीबांत वाटून त्याचा निशेध करू शकता ना? हे प्रश्न त्या व्यक्तींना का पडत नसतील? देवच जाणो.
बरं आजून एक ऐनवेळी टिवटिव करणारे फुरोगामी शंकरावर अभिषेक केला की कुञं भुंकल्यागत भुंकणारे जेंव्हा रस्त्यांवर दुधाचा अभिषेक होतो तेंव्हा का शेपुट घालून बसतात ते कळत नाही ब्याँ.
आजुन एक विषय सध्या चालू आहे जो असा की मुलांना पहिलीत 5 व्या वर्षी पाठवणे अवश्यक करावे त्या वर सरकारने निर्णय दिला की ,"मुलांना लहाणपण जगू द्या."ह्या सगळ्यात ज्या महाशयांनी तो निर्णय मांडला होता की 5 वर्ष करावे ह्यांना एवढं देखील कळत नाही का,की आख्या हिंदुस्तानात आज एन.सी.ई.आर.टी. चा अभ्यासक्रम लागू आहे तिथे आपल्या राज्यात फक्त 12वी ला 5-10 मार्क घ्या व पास व्हा हा प्रकार बदलावा अस कधीच ह्यांना वाटलं नाही का? दुसरे म्हणजे आपल्या ईथे एक येडं लागलेल आहे ते म्हणजे मुलांना पुस्तकी किडा बनवून सोडायचे आणि प्रात्यक्षीत माहीती काहीच म्हणम्या पैक्षा थोडीच द्यायची आता त्या पुस्तकी माहीती येणार आहे का पुढे कामाला? हे प्रश्न आजच्या राजकारण्यांना कधीच पडत नाहीत.कारण ह्यांना फक्त आणि फक्त विकास करायचा आहे नाही असे मी म्हटलोच नाही पण तो फक्त व फक्त स्वत:चाच आणि ह्याना आपला कार्यकर्ता एकदम जीव लावून मदत करतो त्या बदल्यात त्याला मिळत काय ह्याचा विचार सगळ्यांनीच करायला हवा...

Sunday, July 1, 2018

डॉक्टर

 "डॉक्टरकी हा एक व्यवसाय नसून ही एक समाजसेवा आहे असे मानणाऱ्या माझ्या आयुष्यातील प्रत्येक डॉक्टरांना सलाम."



अत्यंत सिरीयस पेशंट दवाखाण्यात आला म्हणून जेवणावरून उठणारे डॉक्टर (दुर्देवाणे नाव विसरलो आज तुमचे) किंवा पैशाची पर्वा न करता मुंबईमध्ये वन रुपी क्लिनिक उघडणारे  डॉ.राहूल घुले सर असोत.
 आज मी माझे सुदैव मानतो.ज्यांनी फक्त वैद्यकीय क्षेत्रातच नव्हे , तर क्रीडा कला आणि साहित्य या क्षेत्रात देखील त्यांचे नाव आज एका उंचीवर नेवून ठेवले आहे मग ते आमचे डॉ.सुरेश काका,ज्यांच्यामुळे आज माझ्या लेखणीला एक बरोबर मार्ग मिळाला,तसेच सामाजीक क्षेञात कार्य करण्याची आवड ज्यांच्यामुळे निर्माण झाली किंवा उत्तम मराठी बोलायला प्रवृत्त करणारे वैद्य.अतुल सर असोत.ह्या सगळ्यांचा सहवास मला ह्या पुण्यभुमीवर लाभला या साठी.
ह्यां सगळ्या डॉक्टरांना माझा सलाम...
आपल्या सर्वांना वैद्य दिवसाच्या हार्दीक शुभेच्छा👏

Monday, May 28, 2018

सावरकर जांना समजले नाहीत!

सावरकर जांना समजले नाहीत


         खरे पहायचे झाले तर स्वातंत्र्यवीर सावरकरांवर लिहिण्यासाठी माझी तेवढी लायकी नाही कारण ह्या जगात सावरकरांवर अनेक अभ्यासू व्यक्ती अशा आहेत की जे सावरकरांना माझ्यापेक्षा जास्त ओळखत असतील किंवा त्यांनी सावरकरांना माझ्यापेक्षा जास्त अभ्यासले असतील म्हणून आज सावरकरांवर लिहिण्याची इच्छा नव्हती पण थोड्या वेळापूर्वीच कोणत्यातरी इसमाने एक ब्लॉग पोस्ट केला शीर्षक होते "सावरकरांच्या नावापुढे वीर लावणे कितपत बरोबर'' (शिर्षक हे मुळ हिंदीमध्ये असून मी त्याचा मराठी अनुवाद केला आहे)
       लेख वाचायला सुरुवात केली खरी पण, दोन-चार पॅरेग्राफ वाचले व लेखकाच्या बुद्धीचा अंदाज साधारणता समजला व वाचन सोडून दिले त्या लेखकाशी विरोध म्हणून किंवा सावरकरांवरील प्रेम म्हणून नव्हे तर एक साधारण हिंदुस्थानातील नागरिक म्हणून आजचा विचार मांडत आहे.  
       इसवी सन 1883 मध्ये जन्मलेल्या सावरकरांवर आजपर्यंत अनेक आरोप लावले जातात. आता सगळ्याच आरोपांचे खंडन किंवा स्पष्टीकरण देत बसायचे झाले तर वाचक म्हणतील की,"खूप मोठ लिहितो!ह्याचे ब्लॉग वाचणे म्हणजे भुशातून सुई शोधण्यासारखे होईल."त्यामुळे काही निवडक आरोपांचे स्पष्टीकरण अगदी थोडक्या शब्दात मांडण्याचा प्रयत्न करेल

       सावरकरांवर सर्वप्रथम आरोप केला जातो की ते गांधीवादाचे सूत्रधार होते. सावरकर विरोधी लोक सावरकरांना गांधी वधाचा सूत्रधार म्हणतात का ते पाहू. जेव्हा नथुराम गोडसे गांधींचा वध करण्यासाठी निघाले त्याआधी त्यांनी सावरकरांचे दर्शन घेतल्यामुळे (दर्शन म्हणजे आशीर्वाद थोडक्यात).
 माझा  ह्या अशा विचारांच्या माणसांना अगदी छोटासा प्रश्न आहे. तो असा की  तुम्ही सगळ्यांनीच आत्तापर्यंतच्या आयुष्यात कुठली ना कुठली परीक्षा दिली असेल ना? त्यासाठी जाण्यापूर्वी घरातील वडीलधाऱ्यांचा पाया तर तुम्ही पडलात असाल ना ? आणि योगायोग तुम्ही त्या परीक्षेत नापास झालात!चला अगदीच काठावर पास झालात तर तोंड वर करून म्हणता का बापाच्या पाया पडलो म्हणून असे झाले? बरं तरी तुमच्या वडिलांना त्या विषयाबद्दल कितपत माहिती असते?
          हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा असा म्हणजे स्वतः नथुरामांचे  न्यायालयातील स्टेटमेंट तुमच्यापैकी किती जणांनी वाचले आहे? त्यात त्यांनी स्वच्छ भाषेत सांगितले आहे की तात्यारावांचा म्हणजेच स्वातंत्र्यवीर सावरकरांचा ह्या कटामध्ये काहीही हात नव्हता...

       आता वळूयात दुसऱ्या आरोपाकडे सर विल्यम कर्झन वायली यांची हत्या मदनलाल धिंग्रा यांनी लंडनमध्ये 1 जुलै 1909 मध्ये केली. जॅक्शन हत्या प्रकरणात देखील त्यांनाच दोषी  मानल जात. असे अनेक हत्याकांड त्यांच्या नावाने रजिस्टर केले जातात . त्यासाठी एकच विचार या ठिकाणी म्हणतो,जेव्हा तुमच्या देशातील सैनिकाला दुसऱ्या देशातील  सैनिक गोळी मारण्याचा प्रयत्न करतो किंवा त्याला मरणाच्या दारी नेतो तेव्हा एक खरा देशभक्त दुसऱ्या दिवशी त्याचा बदला म्हणून त्या दुसऱ्या सैनिकांवर गोळीबार करतो व त्यास मरणाच्या दारी नेतो यात आपल्या सैनिक चुकीचे करतो का? त्याचप्रमाणे इंग्रज कोण होते याचा विचार आपण करायला पाहिजे. अहो एवढेच काय आज जर सख्ख्या भावाने वाटणीतील जमिनीचा एक तुकडा जास्त घेतला तर त्याला मारायला उठतात.इंग्रज तर दुसरीच गोष्ट झाली ना मग.स्वतःच्या मातृभूमीसाठी  शस्त्र उचलले तर काय वाईट केलं?


       अजून एक आरोप सावरकरांवर लावला जातो तो म्हणजे ते माफीवीर होते.  त्यांनी इंग्रजांना माफीनामे पाठवले आहेत. आता तुम्हाला savarkar नावाची कावीळ झाली असेल तर, त्याला मी काही करू शकत नाही.  कारण त्यांना जेंव्हा अंदमानातून रत्नागिरीत आणलं गेलं.  तेव्हा एका अटीवर आणले गेले . ती अट म्हणजे "तुम्हाला काही दिवस स्थानबद्धतेत राहावे लागेल" ,म्हणजे सोप्या भाषेत सांगायचे झाले तर "नजर कैदेत" आणि असे असताना तुम्ही हिंदुस्थानच्या राजकारणात भाग घेणार नाही. (अर्थातच ही गोष्ट फक्त आणि फक्त स्थानबद्धतेत असतानाच बर का ). आता त्यांना माफीवीर तेव्हाच म्हणावे लागेल जेव्हा ते  स्थानबद्धतेतुन मूक्त झाल्यावर देखील, वरील म्हणणे ऐकले . तेव्हाच वरचा आरोप  खरा ठरेल ना? स्थानबद्धतेतुन  सुटका झाल्यावर परत सावरकरांनी राजकारणात उडी घेतली आहे.  याचे अनेक पुरावे आज उपलब्ध आहेत माहिती नसतील तर सावरकर चरित्र वाचून समजून घ्या.

       त्या राजकारणातल्या उडी वरून लक्षात आले अजून एक खूप मस्त आरोप त्यांच्यावर लावला जातो,
त्यांची जी उडी (समुद्रातील) आज जगप्रसिद्ध आहे.  त्यावर  काही लोक म्हणतात की त्यात काय 25 फर्लांग कोणीपण पूर्ण करू शकतो यावरूनच लक्षात येते की तुझा जन्म मस्करीतच  झाला असावा. त्या ऐतिहासिक उडी बद्दल थोडी स्पष्टीकरण देऊ इच्छितो . सावरकरांनी कोठून उडी मारली आहे वो? अर्थातच जहाजातून बरोबरच ना मग जहाज काही पाण्याला म्हणजेच समुद्रातील पाण्याला लागून चिटकून (सपाट)नसते हे माहिती असेलच . मग एवढं पण माहिती असेल की ,एखादी वस्तू पाण्यात जेवढे वरून टाकाल , तेवढीच ती खाली जाते.  नसेल माहिती तर प्रयोग करून पहा . दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कैद्यांच्या संडासाला काही रिकामी खिडकी नसते किंवा तशा प्रकारचे साधन असते की ज्यातून सहजरीत्या बाहेर येता येईल त्यामुळे त्या खिडकीचा काच फोडून बाहेर यावे लागते व तिथे काही काच कापण्याचे यंत्र उपलब्ध नसते.  त्यामुळे फुटलेली काच हि काही सरळ पद्धतीने तुटणार नाही, ती ओबडधोबडच तुटणार यात काहीच शंका नाह.  बरं त्यापेक्षाही महत्त्वाची गोष्ट ही की ती काच अंगाला थोडेफार खर्चंटणारच . बरं  उडी मारायची कशात तर खाऱ्या पाण्यात.  एक छोटा प्रयोग वरील प्रश्न उपस्थित करणाऱ्यांसाठी करून पहावा की घरी बसल्यावर सुईने एक टूचकी हाताच्या बोटाला मारावी व मिठाच्या पाण्यात बोट घालावे.  सुंदर अप्सरेचा स्पर्श झाल्यासारखे वाटते का ते पहावे?
       बरं अजून एक मुद्दा म्हणजे समुद्रात आपण एकटेच नाही आहोत तिथे वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी राहतात. हे मी सांगायची गरज नाही त्यातील एखादे देव माशाचे पिल्लू,पिल्लू बरका समोरून स्वागताध्यक्ष म्हणून आले तर, तुमची मागून-पुढून पिवळी,अोली असे अनुक्रमे होणार यात काही शंका नाही त्यामुळे हा आरोप करताना थोडासा विचार करावा ही विनंती.!

Thursday, May 17, 2018

बालपण Via वृद्धाश्रम

बालपण Via वृद्धाश्रम


 

 आज काल एक नविनच Tread निर्माण झाला आहे तो म्हणजे आई वडील साधारणतः सत्तरीत गेली की सोडले त्यांना आश्रमात आणि मुले महिन्याला पैसेही पाठवतात अनं सुट्टीला बायका पोरांसकट चौपाटीवर भेळ खात बसणार बरोबर ना?   आता ह्या सगळ्या गोष्टी मध्ये दोन साम्य सगळ्यांच असत ते म्हणजे मुले आईवडिलांना शिव्या देतात ( अगदीच शब्दशः अर्थ नको ) व दुसरी गोष्ट मुले आम्हाला सांभाळत नाहीत असे उत्तर मी स्वतः ऐकले बरका ...
म्हणजे जेंव्हा जेंव्हा मी गावी जातो तेंव्हा काही कारणास्तव आमच्या इथे असलेल्या वृद्धाश्रमात जातो अगदी अवर्जुन नव्हे पण मनात आल की.ह्या सगळ्या गोष्टींमध्ये एकच म्हणने प्रत्येक दाम्पत्याचे असते ते म्हणजे " मुले आम्हास सांभाळत नाहीत " तेंव्हा माझा अगदी लहान प्रश्न असतो तो आसा की," जेंव्हा ते लोक लहान होते तेव्हा तुम्ही भांडायचात का? "समोरचा अगदी हुशारीणे उत्तर द्यायचा की, "आता संसार म्हाटलं की भांडाणं आलीच की,तू अजून लहान आहेस तुला काय कळणार असे " हो मला मान्य आहे मी लहान आहे मला समजणार नाही हे सगळ पण एवढं मात्र मला कळतं की ते मोठे करतात त्याचच अनुकरण लहान मुले करतात. अगदी मी ही,माझे आईवडील जसे रहायचे तसाच मी रहायचो मग तुम्ही करत असलेल्या भांडणाचा प्रभाव देखील त्या मुलांच्या मनावर पडत असेल की कुठेना कुठे .
म्हणजे एक जन सहज भांडत भांडत समोरच्याच्या कानाखाली मारतो अन ते सर्व मुलगा पाहतो मग दुसऱ्या दिवशी मुलाचे शाळेत भांडण होते व त्याला कालचा प्रसंग आठवतो मग तो विचार करतो काल आपल्या वडिलांनी केले ते बरोबरच असणार व मुलगा समोरच्याची कानशीळ गरम करतो बरोबर का नाही ? बर वरून शिव्यांचा jackpot भेटणार ते वेगळच काहीस...पण हा विचार कधी डोक्यात येत नसेल का मुलं समोर आहेत नाही भांडायला पाहीजे आपण .

आता येवूयात शिव्यांच्या मुद्यावर काहींच म्हणन असही असत की आमची मुले आम्हाला मारतात.या ठिकाणी अवर्जून सांगाव वाटतं की कालच एक चलचिञफीत पाहीली म्हणजे मराठीत video. त्यात एक बाळ आईला म्हणत की तुला अक्कल नाही तु मुर्ख आहेस अश्या सगळ्या गोष्टी बरका.बर बाळा वय वर्ष लक्षात घेता त्याला हे पण माहीती नसत की आपण काय खाव अन काय नाही अश्या बाळाला तुम्ही शिव्या द्यायला शिकवता!अनं मोठे पणी हेच केल्यावर डोक्याला हात लावता पण तो पर्यंत वेळ गेलेली असते. मलाही मान्य आहे 21 शतक आहे प्रत्येक आई वडील त्यांच्या मुलांच्या लहानपणीच्या आठवणी साठवू ईच्छीता पण आश्या? म्हणजे, 'सोनू आता बाबा तुला मालणाल अन मग तू बाबाला माल हं...' म्हणजे पप्पा 70 चा झाला की सोनू एक लाथ मारतो आणि पप्पांची पोस्टींग डायरेक्ट आश्रमच बरोबर ना? मजा मस्ती करायला काहीच हरकत नाही अगदीच माझ्याही बाबतीत केलीच असणार पण असलं मारा मारी नाही .बरं जरी सांगीतल्या असल्या तरी आमच्या नशिबी आज्जी आजोबा असायचे लहाणपणी एकञ कुटुंब पद्धती असल्यामुळे.आता तर आज्जी आजोबा नुसते फोटोत मग मुलगा विचारणार आई कधी भेटणार ह्यांना मग आई म्हणनार जावू 4-5 वर्षांनी ते वैकुंठास गेल्यावर .
ह्या सगळ्या गोष्टींमध्ये कुठे तरी चुक,म्हणजे 30% का होईना पण पालकांची पण आहेच ना?अर्थातच उर्वरीत 70% मुलांची पण आहे पण त्यांना लहाण पणा पासून जे शिकवलं तेच ते करणार ना ह्यात काही वाद मला दिसत नाही .
(वाचकांमधल्या सगळ्या पालकांची मी क्षमा मागतो अतिशय negative पद्धतीने तुम्हाला ईथे दर्शवीले पण वरील सर्व गोष्टींचा विचार कुठे तरी करायला हवाच ना?)

Sunday, May 13, 2018

लोकमान्य


लोकमान्य


सध्या चालू असलेला वाद म्हणजे लोकमान्य टिळक दहशतवादाचे जनक...
हो मलाही वाटते की टिळक दहशतवादाचे जनक आहेत परंतू कसे , कोणासाठी या सर्व गोष्टींचा थोडाफार विचार करायला नको का? तसेच ते कोणासाठी दहशतवादी आहेत याचा उल्लेख देखील राजस्थान सरकारने करायला नको का?याचा विचार आपण करायला हवाच.
माझ्या माहीती नुसार फाशीचा कलम अक्षरश: बदलायला भाग पाडले असे टिळक हे इंग्रजांसाठी दहशतवादीच म्हणावे लागेल ना. पण मग आपण नेमके चुकतो तरी कुठे?
ते इंग्रज हिंदुस्तानातून जावून आज जवळपास किती वर्षे झाली?तरी देखील आपण त्यांनी सांगीतलेल्या गोष्टींवरच विश्वास आज आपण ठेवतो हे बरोबर आहे का?याचा विचार आपण का करत नाही?
आता हिंदु संस्कृती नुसार गंगे मध्ये स्नान करणे म्हणजे इंग्रजांच्या मते एक धोतांडच तर त्यांच्या धर्मक्षेञांमध्ये असलेल्या टबात (पाण्याचा)जेंव्हा त्यांचा पुजारी एखाद्याला बुडवतो आणि म्हणतो की,तुझा आज पासून जुन्या आयुष्याशी काहीही संबंध नाही तु चांगला माणुस आज पासून आहेस.हे धोतांड नव्हे का?
विषयांतर नको व्हायला म्हणून परत एकदा टिळकांकडे वळतो.जे टिळक समजा सहज एका चौकात थांबून नुसते "आरे"म्हणले तरी इंग्लंड मध्ये ही बातमी जात असे आता ह्यास त्यांच्या मनातील दहशतच म्हणावे लागेल ना परंतू आजही आपण तेच करतो जे इंग्रजांना वाटत होते.
आता प्रश्न येतो तो म्हणजे टिळक हे प्रखरता वादी होते म्हणजे "ब्रिटीशांच्या पाया पडून काही स्वातंञ मिळणार नाही असा त्यांचा ठाम विश्वास होता."असे काहीसे त्या पुस्तकात म्हटले आहे.ह्यात नेमक काय चुकलं तेच कळत नाही.जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात जा व वाचा त्यांचा त्यांचा स्वातंञ्य संग्राम व पहा कोणाला तरी भेटलय का न लढता,न प्राणं गमावता स्वातंञ्य कोणाला? आता स्वत:च्या हक्कासाठी हातात शस्ञ घेणे निव्वळ ह्या कारणामुळे जर तुम्ही आज पण टिळकांना दोषी ठरवत असाल तर ते आज ह्या हिंदुस्तानाचे दुर्देवच म्हणावे लागेल नव्हे का?

Note:-(सदर विचार हे आपलच खरं असे म्हणनाऱ्या किंवा बालबुद्धींच्या व्यक्तीस हानिकारक असू शकतात शक्यतो अश्या व्यक्तींनी विचार वाचू नयेत ही विनंती.🙏🏻)

"आठवणील पठाणकोट एअर फोर्स स्टेशन"

  31 डिसेंबर 2015 त्यादिवशीही एकीकडे संपूर्ण देश नवीन इंग्रजी वर्षाच्या स्वागताच्या तयारीत होता, तर दुसरीकडे एक मोठे संकट नवीन वर्षाच्या...