Ads

Sunday, May 13, 2018

लोकमान्य


लोकमान्य


सध्या चालू असलेला वाद म्हणजे लोकमान्य टिळक दहशतवादाचे जनक...
हो मलाही वाटते की टिळक दहशतवादाचे जनक आहेत परंतू कसे , कोणासाठी या सर्व गोष्टींचा थोडाफार विचार करायला नको का? तसेच ते कोणासाठी दहशतवादी आहेत याचा उल्लेख देखील राजस्थान सरकारने करायला नको का?याचा विचार आपण करायला हवाच.
माझ्या माहीती नुसार फाशीचा कलम अक्षरश: बदलायला भाग पाडले असे टिळक हे इंग्रजांसाठी दहशतवादीच म्हणावे लागेल ना. पण मग आपण नेमके चुकतो तरी कुठे?
ते इंग्रज हिंदुस्तानातून जावून आज जवळपास किती वर्षे झाली?तरी देखील आपण त्यांनी सांगीतलेल्या गोष्टींवरच विश्वास आज आपण ठेवतो हे बरोबर आहे का?याचा विचार आपण का करत नाही?
आता हिंदु संस्कृती नुसार गंगे मध्ये स्नान करणे म्हणजे इंग्रजांच्या मते एक धोतांडच तर त्यांच्या धर्मक्षेञांमध्ये असलेल्या टबात (पाण्याचा)जेंव्हा त्यांचा पुजारी एखाद्याला बुडवतो आणि म्हणतो की,तुझा आज पासून जुन्या आयुष्याशी काहीही संबंध नाही तु चांगला माणुस आज पासून आहेस.हे धोतांड नव्हे का?
विषयांतर नको व्हायला म्हणून परत एकदा टिळकांकडे वळतो.जे टिळक समजा सहज एका चौकात थांबून नुसते "आरे"म्हणले तरी इंग्लंड मध्ये ही बातमी जात असे आता ह्यास त्यांच्या मनातील दहशतच म्हणावे लागेल ना परंतू आजही आपण तेच करतो जे इंग्रजांना वाटत होते.
आता प्रश्न येतो तो म्हणजे टिळक हे प्रखरता वादी होते म्हणजे "ब्रिटीशांच्या पाया पडून काही स्वातंञ मिळणार नाही असा त्यांचा ठाम विश्वास होता."असे काहीसे त्या पुस्तकात म्हटले आहे.ह्यात नेमक काय चुकलं तेच कळत नाही.जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात जा व वाचा त्यांचा त्यांचा स्वातंञ्य संग्राम व पहा कोणाला तरी भेटलय का न लढता,न प्राणं गमावता स्वातंञ्य कोणाला? आता स्वत:च्या हक्कासाठी हातात शस्ञ घेणे निव्वळ ह्या कारणामुळे जर तुम्ही आज पण टिळकांना दोषी ठरवत असाल तर ते आज ह्या हिंदुस्तानाचे दुर्देवच म्हणावे लागेल नव्हे का?

Note:-(सदर विचार हे आपलच खरं असे म्हणनाऱ्या किंवा बालबुद्धींच्या व्यक्तीस हानिकारक असू शकतात शक्यतो अश्या व्यक्तींनी विचार वाचू नयेत ही विनंती.🙏🏻)

No comments:

Post a Comment

"आठवणील पठाणकोट एअर फोर्स स्टेशन"

  31 डिसेंबर 2015 त्यादिवशीही एकीकडे संपूर्ण देश नवीन इंग्रजी वर्षाच्या स्वागताच्या तयारीत होता, तर दुसरीकडे एक मोठे संकट नवीन वर्षाच्या...