Ads

Thursday, May 17, 2018

बालपण Via वृद्धाश्रम

बालपण Via वृद्धाश्रम


 

 आज काल एक नविनच Tread निर्माण झाला आहे तो म्हणजे आई वडील साधारणतः सत्तरीत गेली की सोडले त्यांना आश्रमात आणि मुले महिन्याला पैसेही पाठवतात अनं सुट्टीला बायका पोरांसकट चौपाटीवर भेळ खात बसणार बरोबर ना?   आता ह्या सगळ्या गोष्टी मध्ये दोन साम्य सगळ्यांच असत ते म्हणजे मुले आईवडिलांना शिव्या देतात ( अगदीच शब्दशः अर्थ नको ) व दुसरी गोष्ट मुले आम्हाला सांभाळत नाहीत असे उत्तर मी स्वतः ऐकले बरका ...
म्हणजे जेंव्हा जेंव्हा मी गावी जातो तेंव्हा काही कारणास्तव आमच्या इथे असलेल्या वृद्धाश्रमात जातो अगदी अवर्जुन नव्हे पण मनात आल की.ह्या सगळ्या गोष्टींमध्ये एकच म्हणने प्रत्येक दाम्पत्याचे असते ते म्हणजे " मुले आम्हास सांभाळत नाहीत " तेंव्हा माझा अगदी लहान प्रश्न असतो तो आसा की," जेंव्हा ते लोक लहान होते तेव्हा तुम्ही भांडायचात का? "समोरचा अगदी हुशारीणे उत्तर द्यायचा की, "आता संसार म्हाटलं की भांडाणं आलीच की,तू अजून लहान आहेस तुला काय कळणार असे " हो मला मान्य आहे मी लहान आहे मला समजणार नाही हे सगळ पण एवढं मात्र मला कळतं की ते मोठे करतात त्याचच अनुकरण लहान मुले करतात. अगदी मी ही,माझे आईवडील जसे रहायचे तसाच मी रहायचो मग तुम्ही करत असलेल्या भांडणाचा प्रभाव देखील त्या मुलांच्या मनावर पडत असेल की कुठेना कुठे .
म्हणजे एक जन सहज भांडत भांडत समोरच्याच्या कानाखाली मारतो अन ते सर्व मुलगा पाहतो मग दुसऱ्या दिवशी मुलाचे शाळेत भांडण होते व त्याला कालचा प्रसंग आठवतो मग तो विचार करतो काल आपल्या वडिलांनी केले ते बरोबरच असणार व मुलगा समोरच्याची कानशीळ गरम करतो बरोबर का नाही ? बर वरून शिव्यांचा jackpot भेटणार ते वेगळच काहीस...पण हा विचार कधी डोक्यात येत नसेल का मुलं समोर आहेत नाही भांडायला पाहीजे आपण .

आता येवूयात शिव्यांच्या मुद्यावर काहींच म्हणन असही असत की आमची मुले आम्हाला मारतात.या ठिकाणी अवर्जून सांगाव वाटतं की कालच एक चलचिञफीत पाहीली म्हणजे मराठीत video. त्यात एक बाळ आईला म्हणत की तुला अक्कल नाही तु मुर्ख आहेस अश्या सगळ्या गोष्टी बरका.बर बाळा वय वर्ष लक्षात घेता त्याला हे पण माहीती नसत की आपण काय खाव अन काय नाही अश्या बाळाला तुम्ही शिव्या द्यायला शिकवता!अनं मोठे पणी हेच केल्यावर डोक्याला हात लावता पण तो पर्यंत वेळ गेलेली असते. मलाही मान्य आहे 21 शतक आहे प्रत्येक आई वडील त्यांच्या मुलांच्या लहानपणीच्या आठवणी साठवू ईच्छीता पण आश्या? म्हणजे, 'सोनू आता बाबा तुला मालणाल अन मग तू बाबाला माल हं...' म्हणजे पप्पा 70 चा झाला की सोनू एक लाथ मारतो आणि पप्पांची पोस्टींग डायरेक्ट आश्रमच बरोबर ना? मजा मस्ती करायला काहीच हरकत नाही अगदीच माझ्याही बाबतीत केलीच असणार पण असलं मारा मारी नाही .बरं जरी सांगीतल्या असल्या तरी आमच्या नशिबी आज्जी आजोबा असायचे लहाणपणी एकञ कुटुंब पद्धती असल्यामुळे.आता तर आज्जी आजोबा नुसते फोटोत मग मुलगा विचारणार आई कधी भेटणार ह्यांना मग आई म्हणनार जावू 4-5 वर्षांनी ते वैकुंठास गेल्यावर .
ह्या सगळ्या गोष्टींमध्ये कुठे तरी चुक,म्हणजे 30% का होईना पण पालकांची पण आहेच ना?अर्थातच उर्वरीत 70% मुलांची पण आहे पण त्यांना लहाण पणा पासून जे शिकवलं तेच ते करणार ना ह्यात काही वाद मला दिसत नाही .
(वाचकांमधल्या सगळ्या पालकांची मी क्षमा मागतो अतिशय negative पद्धतीने तुम्हाला ईथे दर्शवीले पण वरील सर्व गोष्टींचा विचार कुठे तरी करायला हवाच ना?)

No comments:

Post a Comment

"आठवणील पठाणकोट एअर फोर्स स्टेशन"

  31 डिसेंबर 2015 त्यादिवशीही एकीकडे संपूर्ण देश नवीन इंग्रजी वर्षाच्या स्वागताच्या तयारीत होता, तर दुसरीकडे एक मोठे संकट नवीन वर्षाच्या...